अमरावती जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र वाटप केले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी आपले सरकार सेवा मिळवण्याची एक सुवर्णसंधी असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले सेवा केंद्र दिले जाणार असून या संबंधीत जाहिरात त्यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे त्याच पद्धतीने शेवटी अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू इच्छित असाल तर पात्रता जाणून घेणे तसेच अर्जाची शेवटची तारीख जाणून घेणे आवश्यक असेल.
आपले सरकार सेवा केंद्र
अर्ज चालू होण्याची तारीख – 23-6-2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7-7-2025
अर्ज प्रक्रिया- ऑफलाईन
अर्ज कसा सादर करावा?
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यामध्ये सर्वात शेवटी जाहिरातीत अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे त्याची प्रिंट काढून संपूर्ण अर्ज योग्य प्रकारे भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून उमेदवारांनी नुझल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी जमा करावा.
आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करण्यापूर्वी खालील बाबी व अटी शर्ती लक्षात घ्याव्या
- अर्ज करत असलेल्या उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- कॅम्पुटर संबंधित इतर प्रकारचे कोर्स किंवा MSCIT चा कोर्स पूर्ण झालेला असावा.
- आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर जर पूर्वी कारवाई केलेली असेल तर त्यांना अर्ज करता येणार नाही.
- आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारी व्यक्ती नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत अशा ठिकाणची रहिवासी असावा.
- ज्या व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्र मिळेल अशा व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीस प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणासाठी चालवण्यास देता येणार नाही.
- अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा खोटी माहिती तसेच अर्जातील खोडतोड आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबत कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नसून विनामूल्य दिले जाणार आहे.
- एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल.
- मुलाखतीच्या वेळेला संपूर्ण ओरिजनल डॉक्युमेंट सादर करावे असे न केल्यास इतर व्यक्तींना पात्र ठरवले जाईल.
निवड प्रक्रिया खालील पद्धतीने
निवड प्रक्रियेमध्ये एकूण 100 गुण असतील.
पदवीधर असलेला अर्जदार- 30 गुण
पदव्युत्तर असलेला अर्जदार- 25 गुण
सीएससी सेंटर असणारा अर्जदार- 25 गुण
मुलाखत – 20 गुण
अशाप्रकारे वरील सर्व गुणांनुसार व मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड प्रक्रिया केली जाईल व त्या ठिकाणी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आपले सरकार सेवा केंद्र दिले जाईल.