पीएम किसान योजनेत 2 मोठे नविन बदल, शेतकऱ्यांना दिलासा | PM Kisan Yojana 

Aapla shetkari

पीएम किसान योजनेत 2 मोठे नविन बदल, शेतकऱ्यांना दिलासा | PM Kisan Yojana 

PM kisan nirnay, PM Kisan Yojana, पी एम किसान योजनेची लाभार्थी, पीएम किसान योजनेत 2 मोठे नविन बदल

देशामध्ये मोठ्या संख्येने पी एम किसान योजनेची लाभार्थी आहे व दिवसेंदिवस या योजनेचे लाभार्थी वाढत चाललेले आहे परंतु यातही काही अटींमध्ये पात्र नसून सुद्धा जे लाभार्थी लाभ घेत होते, त्यामध्ये इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी अशा संबंधित एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ज्या लाभार्थ्यांनी वॉलेंटरी सरेंडर केलेले होते किंवा त्यांना शासनाच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले होते, परंतु असे शेतकऱ्यांकडून पीएम किसान योजनेचे मिळालेले हप्ते वापस घेण्याची म्हणजेच वसुलीची मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेली होती.

 

रिफंडची प्रक्रिया चालू झालेली असून देशभरातील बोगस लाभार्थ्याकडून आतापर्यंत जवळपास 400 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने वसूल केलेली आहे, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अपात्र म्हणजेच बोगस लाभार्थ्यांना नोटीसा पाठवून रिफंड देण्याचे सांगितले जात होते त्याचप्रमाणे ज्यांनी वॉलेटरी सरेंडर केलेले आहे अशांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन रक्कम भरावी लागत होती परंतु आता मात्र रिफंड देण्याबाबत ऑनलाईन पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे तहसील कार्यालयात जाण्याची गरज नसेल.

 

शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वॉलेटरी सेंटर हे ऑप्शन पीएम किसान च्या पोर्टलवर टाकण्यात आलेली होते, त्यामध्ये ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा नसेल किंवा स्वतःहून योजनेतून बाहेर निघायचे असेल तर यांच्यासाठी ही ऑप्शन होते, परंतु काही शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे ऑप्शन निवडल्याने या ऑप्शनमुळे शेतकऱ्यांना कायमचे योजनेतून बाहेर काढण्यात आलेले होते व एकदा या ऑप्शनवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा कधीच योजनेचा लाभ घेता येत नव्हता, परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या वारंवार विनंती मुळे पत्रामुळे शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वॉलेंटरी सरेंडर चे ऑप्शन रिमूव करण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

 

अशाप्रकारे दोन ऑप्शन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, त्याच पद्धतीने 15 जून पर्यंत केवायसी प्रक्रिया तसेच ॲग्री स्टॅग वरची नोंदणी प्रक्रिया राहणार होती, व आता यानंतर लगेचच नवीन लाभार्थी सुद्धा योजनेमध्ये ऍड केले जायील व पीएम किसान योजनेचा नवीन हप्ता सुद्धा काही दिवसातच शासनाच्या माध्यमातून घोषणा करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल.

 

सौरचलीत फवारणी यंत्रासाठी 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया चालू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment